
गाडगे बाबांचे जीवन कार्य चिरकाल प्रेरणादायीच होते :- लोककवी विलास भालेराव
साप्ताहिक सागर आदित्य
गाडगे बाबांचे जीवन कार्य चिरकाल प्रेरणादायीच होते :- लोककवी विलास भालेराव
कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबांनी केवळ कथनी कीर्तन नव्हे तर श्रम करणीची जोड देत विकसनशील राष्ट्र आणि आदर्श गाव कसा असावा हे कीर्तनच्या माध्येमातून जना समोर मांडले. श्रम केल्या शियाय कुणाची भाकरीच खायची नाही. हा त्यांच्या जीवनाचा खरा सिद्धांतच होता. देव,दैव,नशीब,अस्वच्छता,अंधश्रद्धा व कालबाहये रूढी परंपरा ह्यावर कडाडून
हल्ला केला. म्हणून कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे बाबाचे जीवन कार्य हे चिरकाल प्रेरणादायी होते असा विचार राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमातून मांडला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सुर्यलक्ष्मी शिक्षण,कला,क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था वाशिमच्या वतीने स्थानिक नालंदा नगर येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते.
पुढे बोलताना लोककवी विलास भालेराव म्हणाले की, किर्तन परंपरेतील कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा असे एकमेव संत होत की, ज्यांनी आपल्या कीर्तनातून तर्कशुद्ध, विवेकी व विज्ञानवादी विचार दिला.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलीत करून संस्थाध्यक्ष लोककवी विलास सूर्यभान भालेराव, प्रसिद्ध गायिका रमाबाई शिरसाट चानी-चतारी , गायक अनिल शिरसाट, गायिका कस्तुराबाई भालेराव,वनिता भगत यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले.व रात्री रमाबाई शिरसाट यांचा गीत गायनाच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शितल भालेराव, सुमेधानंद भालेराव, नितीन भालेराव, अरविंद उचित, मदन उचित, सूर्या भालेराव, विनयकुमार भालेराव, अंकित राऊत, शुभम कंकाळ, अंकुश राऊत तसेच संस्था पदाधिकारी व महिला -पुरुष उपस्थित होते.
0 Response to "गाडगे बाबांचे जीवन कार्य चिरकाल प्रेरणादायीच होते :- लोककवी विलास भालेराव"
Post a Comment