पाणी पुरवठा योजना शाश्वत ठेवायची जबाबदारी लोकांची: सीईओ वसुमना पंत
साप्ताहिक सागर आदित्य/
पाणी पुरवठा योजना शाश्वत ठेवायची जबाबदारी लोकांची: सीईओ वसुमना पंत
जल जीवन मिशनच्या माध्यमातुन गावात पाणी पुरवठा योजना तयार होईल मात्र ती पुढे निरंतर सुरु ठेवायची जबाबदारी गावातील लोकांची आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी (दि.१५) केले.
ग्राम स्तरीय लोकप्रतिनिधी व कर्मचार्यांचे चार दिवशिय प्रशिक्षणाचा समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कोणतीही योजना उभी करणे हे एकदम सोपं काम आहे. गावातील लोकांनी योजनेची देखभाल करणे, पाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी नियमित भरणे आणि महत्वाचे म्हणजे योजनेविषयी लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होणे गरजेचे असल्याचे सीईओ पंत म्हणाल्या.
प्रशिक्षणाच्या नोंदि महिलांच्या डोक्यात कोरलेल्या...
कृषी विकास व ग्रामिण प्रशिक्षण संस्थेचे संचालक आशिष नाफडे यांची यावेळी उपस्थिती होती. संचालन मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी तर आभार सुदर्शन पवार यांनी मानले.
0 Response to "पाणी पुरवठा योजना शाश्वत ठेवायची जबाबदारी लोकांची: सीईओ वसुमना पंत"
Post a Comment