
वाशिम जिल्ह्यात “अमृत महा आवास" अभियानाला गती..!
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात “अमृत महा आवास" अभियानाला गती..!
वाशिम
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात अमृत महा आवास या योजनेला वाशिम जिल्ह्यात गती मिळाली असुन अभियान कालावधीत आजपावेतो जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत जवळपास ४००० घरकुले पुर्ण झालेली असून उर्वरित ८५८२ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
वाशिम जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय आवास दिनापासून ते दिनांक ३१ मार्च, २०२३ या कालावधीत "अमृत महा आवास अभियान २०२२-२३ राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक १७ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार अभियानास दिनांक ०५ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सर्वांसाठी घरे २०२४ या शासनाच्या धोरणानुसार अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत आहे..
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी शासनाच्या 'सर्वांसाठी घरे - २०२४' या धोरणानुसार “अमृत महा आवास अभियान २०२२-२३” राबवितांना विविध उपक्रमाचे आयोजन केले. केंद्र व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि प्राप्त उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील सर्व घरकुले वेळेत पुर्ण करुन घरकुलांचे लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार जिल्हातील सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची यशस्वी वाटचाल होताना गट विकास अधिकारी, तालुका स्तरावर नेमण्यात आलेले संपर्क अधिकारी, ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, घरकूल ऑपरेटर, उमेद अभियानातील सर्व अधिकारी / कर्मचारी, घरकूल कामकाज संबंधित कर्मचारी यांनी सुक्ष्म नियोजन करुन जिल्ह्यास प्राप्त उद्दिष्टांनुसार घरकूलांची कामे पुर्ण करणेकरिता प्रयत्न करित आहेत.
प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांना यश येताना दिसत असून अभियानास गती आलेली आहे. अभियान कालावधीत आजपावेतो जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत जवळपास ४००० घरकुले पुर्ण झालेली असून उर्वरित ८५८२ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी, तालुका स्तरावरिल सर्व अधिकारी व कर्मचारी हे उर्वरित सर्व घरकुलांची बांधकामे अधिक गतीने पुर्ण करुन जिल्हयात “अमृत महा आवास अभियान २०२२-२३” यशस्वी करणेकरिता प्रयत्न करीत आहेत.
"या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ जून पर्यंत मुदतवाढ मिळाली असुन जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम पुर्ण करावे. तसेच याबाबत कुणाच्या काही अडचणी असल्यास जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा या कार्यालयाशी संपर्क साधावा!" -वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वाशिम
0 Response to "वाशिम जिल्ह्यात “अमृत महा आवास" अभियानाला गती..!"
Post a Comment