स्वप्न दाखवनारा अर्थसंकल्प - विष्णुपंत भुतेकर
साप्ताहिक सागर आदित्य/
स्वप्न दाखवनारा अर्थसंकल्प - विष्णुपंत भुतेकर
आज देशाच्या केद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला. वर वर जरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थ संकल्प वाटत आसला तरी प्रत्यक्षात आणि तात्काळ प्रभावाने शेतकऱ्यांना काही फायदा होईल आसे वाटत नाही. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागणार आहे. 9.62 लाख हेक्टर जमीन सीचंना खाली आन्याचे उद्दीष्ट हा त्याचाच एक भाग आसणार आहे. तेल बिया उत्पादन वाढी बरोबर दाळींचा सुद्धा त्याच पध्दतीने विचार व्हायला हवा होता. नविन कृषी महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली पंरतु प्रथमीक स्तरा पासुन कृषी विषय देशभरात अभ्यासक्रमात समाविष्ट करायला पाहीजे होता. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा, ड्रोन चा वापरा बरोबर अधार प्रमाणे शेतकर्यांना प्रॉपर्टी कार्डचा विचार होणे आवश्यक होते. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूती साठी किसान क्रेडिट कार्ड ला महत्त्व देवुन त्यात सुधारना अवश्यक होत्या. सरकरने शेतकरी अत्महत्या आणि कोरोना काळातील शेतकर्यांच्या योगदाना कडे दुर्लक्ष केल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी म्हटले आहे.
0 Response to "स्वप्न दाखवनारा अर्थसंकल्प - विष्णुपंत भुतेकर"
Post a Comment