स्वच्छ भारत मिशनच्या वतीने 'तुझं गावच नाही का तीर्थ?' मोहिमेचा शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य/
स्वच्छ भारत मिशनच्या वतीने 'तुझं गावच नाही का तीर्थ?' मोहिमेचा शुभारंभ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकारातुन स्वच्छतेबाबत गावात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन आता तुझं गावच नाही का तीर्थ? ही टॅग लाईन घेऊन मोहिम जिल्ह्यातील गावांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये सध्या स्वच्छता रथाच्या माध्यमातुन गावागावात स्वच्छता, ओडिएफ प्लस, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, कोरोना व स्वच्छता ईत्यादी विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. पुढच्या टप्प्यात कलापथकाचे कार्यक्रम व गुड मॉर्निंग मोहिमेला गती देण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांनी दिली.
0 Response to "स्वच्छ भारत मिशनच्या वतीने 'तुझं गावच नाही का तीर्थ?' मोहिमेचा शुभारंभ"
Post a Comment