-->

लाखो रुपयांची नोकरी सोडून....                                तीन युवक सण्यास घेण्याच्या मार्गावर.

लाखो रुपयांची नोकरी सोडून.... तीन युवक सण्यास घेण्याच्या मार्गावर.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

लाखो रुपयांची नोकरी सोडून....                                तीन युवक सण्यास घेण्याच्या मार्गावर.

       सामान्यतः उच्चशिक्षित युवा चांगले पॅकेज ,पगार घेऊन हाय प्रोफाईल जीवन जगण्यात, ऐश आराम सगळ्या सुख सुविधा घेऊन जीवन जगण्यात स्वतःला भाग्यवान समजतात .तर दुसरीकडे जैन संस्कृती ,जैन सिद्धांत उच्च शिक्षण त्यातही सीए ,एमबीए टॉपर ,सोबत संपन्न परिवार असूनही या सगळ्या भौतिक, संसारी मोहमायाचा त्याग , सुख सुविधाचा त्याग करून मुनीमहाराचे प्रवचन ,विचार ऐकून संन्यास घेण्याचा मार्ग अवलंबिता. वैराग्य अंगिकार करून ,मुक्ती वधूला प्राप्त करण्यासाठी या भौतिक सुखाचा त्याग करतात .

     याच मार्गावर आचार्य विशुद्ध सागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांच्या अध्यात्माने प्रभावित होऊन उच्चशिक्षित युवक वैराग्यच्या मार्गावर ,मुनी होण्याच्या मार्गावर निघाले आहे. यावेळी तीर्थवंदना करीत भारतातील विभिन्न शहरात जाऊन मुनी महाराज यांचे दर्शन घेत आहे, त्यांचे आशीर्वाद घेत आहे. याच उद्देशाने मूळचे परतवाडा येथील सौरभ गंगवाल एमबीएपर्यंत शिक्षण असलेले, एका प्रायव्हेट कंपनीत चांगला पॅकेजची नोकरी सोडून ,तसेच मध्यप्रदेश छतरपुर निवासी निखिल भैया यांचे शिक्षण सीए झालेल्या झालेले आहे, तसेच मध्य प्रदेश येथील भिन्न येथील विशाल भैया यांचे शिक्षण बीकॉम झालेले आहे या तिघांनी घरदार सोडून संन्यास मार्गाचा प्रण केला आहे. संसार त्याग करण्याच्या पूर्वीची क्रिया बिलोली व गोद भरायची क्रिया आज वाशीम येथे महावीर भवन नगरपरिषद चौक येथे संपन्न झाली .यांची बिलोली यात्रा खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथून प्रारंभ करून बाळू चौक ,सुभाष चौक ,रमेश टॉकीज, नगरपरिषद चौक येथून धर्मा व लंबी द्वारा वैराग्य मार्गावर निघालेल्या मोक्षमार्गाच्या सन्मान केला .मिरवणुकीत जागोजागी समाज बांधवांनी त्यांची गोद भराई करून पुण्यारजन प्राप्त केले. या सगळ्यांची मुणीदीक्षा आचार्य विशुद्ध सागर जी महाराज यांच्याद्वारे सहा नोव्हेंबर रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहे .या बिलोली यात्रेत सकल दिगंबर जैन समाजातील लोकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन धर्मप्रभावना केली .यावेळी तिन्ही समाजाचे अध्यक्ष  रमेश चंद बज, श्रेणिक भुरे ,प्रकाश गोधा ,विनोद गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. या यात्रेचे सूत्रसंचालन रवी बज यांनी केले .अशी माहिती आमच्या प्रतिनिधीला प्रवीण पाटणी यांनी दिली।

Related Posts

0 Response to "लाखो रुपयांची नोकरी सोडून.... तीन युवक सण्यास घेण्याच्या मार्गावर."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article