-->

शिक्षण यशस्वी जीवनाचा मुलमंत्र... प्राचार्य डॉ. सुभाष जाधव

शिक्षण यशस्वी जीवनाचा मुलमंत्र... प्राचार्य डॉ. सुभाष जाधव

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शिक्षण यशस्वी जीवनाचा मुलमंत्र... प्राचार्य डॉ. सुभाष जाधव

 (जाधव महाविद्यालयात दिक्षारंभ समारंभ संपन्न)

स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशीम येथे नुकताच बी.ए. व बी.एस्सी. भाग एकच्या विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ समारंभ (Inducation Program) पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष जाधव यांनी असे मत मांडले की, 'शिक्षण हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे'! त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, असे मत मांडले.

 नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत निवड श्रेणीवर आधारित श्रेयांक पद्धत ( CBCS) सुरू करण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये पदवीमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ घेण्यात येतो. विद्यार्थ्याला विद्यापीठ व महाविद्यालया अंतर्गत चालणाऱ्या विविध योजना तसेच कार्यप्रणाली याचे ज्ञान व्हावे, या अनुषंगाने या दिक्षारंभ कार्यक्रमाचे महत्त्व आहे.

    मागील वर्षापासून महाविद्यालया मध्ये दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला दिक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळशीरामजी जाधव कला विज्ञान महाविद्यालय येथे नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव हे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये विभाग प्रमुख डॉ.पी.एम. तायडे, डॉ. एस. यु. धामणे डॉ. एस.एस. इंगोले डॉ. डी.एम. ढवारे,डॉ. विजय जाधव, डॉ. आर.व्हि.रुक्के,प्रा. खान  आदी मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या आधुनिक युगामध्ये तरुण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती अधिक जागृती दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करावे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य देणारे शिक्षण द्यावे ही काळाची गरज आहे  त्याशिवाय येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य उज्वल होणार नाही.असेही मत डॉ. सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये डॉ. तायडे यांनी कार्यक्रमाविषयी रूपरेषा मांडली. हा उपक्रम का महत्वाचा आहे, याचे महत्त्व विषद केले. व महाविद्यालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रम व योजना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पदमानंद तायडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मोरे यांनी केले‌.

Related Posts

0 Response to "शिक्षण यशस्वी जीवनाचा मुलमंत्र... प्राचार्य डॉ. सुभाष जाधव"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article