-->

नागरिकांच्या तक्रारी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवाव्यात       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

नागरिकांच्या तक्रारी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवाव्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस



साप्ताहिक सागर आदित्य 

 नागरिकांच्या तक्रारी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवाव्यात

     जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस 


तक्रार निवारण दिनात नागरिकांच्या अडचणींना जिल्हाधिकाऱ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद


वाशिम, नागरिकांच्या तक्रारी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवाव्यात, प्रशासन आणि जनतेत थेट संवाद घडावा तसेच शासनाच्या सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने वाशिम तहसील कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दि. १० जुन रोजी तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी ३ नागरिकांनी उपस्थित राहून विविध तक्रारी व मागण्यांची निवेदने मांडली.


या उपक्रमास परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा, उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण, निवासी नायब तहसीलदार साहेबराव नप्ते तसेच नायब तहसीलदार कैलास देवळे आदी अधिकारी उपस्थित होते.


दरम्यान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की,नागरिकांच्या प्रलंबित महसूल विषयक तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा. प्रकरणे प्रामाणिकपणे तपासून मुदत मर्यादेत निकाल लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचा टाळाटाळ किंवा विलंब सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सेवा अधिक जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने नागरिकांना मिळाव्यात यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर म्हणाल्या , प्राप्त तक्रारींची निवेदनांची नोंद ठेवा, विभागनिहाय कारवाईला गती द्या :

तक्रार निवारण दिनाच्या कार्यवाहीदरम्यान उपविभागीय अधिकारी  वैशाली देवकर यांनी महसूल विभागास महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्या म्हणाल्या, महसूल विभागाकडे येणाऱ्या तक्रारींचे व्यवस्थित वर्गीकरण केले जावे. प्राप्त झालेल्या तक्रारी, निवेदने व त्यांच्या नोंदी यांची यादी तयार करून त्या जिल्हाधिकारी यांच्या समक्ष तक्रार निवारण दिनाच्या बैठकीत सादर कराव्यात.


तसेच, ज्या विभागाच्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारींच्या प्रती संबंधित विभागांना अधिकृतरित्या पाठवाव्यात. एका तक्रार निवारण दिनामध्ये संबंधित विभागांना तक्रारींची माहिती देऊन त्या संदर्भात तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दर मंगळवारी वाशिम तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन: 

नागरिकांच्या प्रशासनाशी थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर मंगळवारी वाशिम तहसील कार्यालयात तालुकास्तरीय तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमामार्फत नागरिक आपल्या समस्या व तक्रारी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतात. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी व तत्पर सेवा यांना चालना मिळत असून, नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

0 Response to "नागरिकांच्या तक्रारी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवाव्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article