-->

नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी         जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  रिसोड व मालेगाव येथे 'तक्रार निवारण दिन संपन्न'

नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस रिसोड व मालेगाव येथे 'तक्रार निवारण दिन संपन्न'



साप्ताहिक सागर आदित्य 

नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी

       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

रिसोड व मालेगाव येथे 'तक्रार निवारण दिन संपन्न' 


वाशिम ,

नागरिकांच्या तक्रारी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवाव्यात, प्रशासन आणि जनतेत थेट संवाद घडावा तसेच शासनाच्या सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आज दि. ११ जुन रोजी रिसोड व मालेगाव येथे तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी  नागरिकांनी उपस्थित राहून  तक्रारी व मागण्यांची निवेदने मांडली.

      नागरिकांच्या समस्या आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांवर थेट संवाद साधण्यासाठी ही तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी.असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.


      रिसोड येथील बैठकीस परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिश शेवदा, ठाणेदार रामेश्वर चव्हाण, गटविकास अधिकारी किशोर लहाने,तालुका कृषी अधिकारी तावरे, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मालेगाव येथील बैठकीस नायब तहसीलदार अरविंद करांगळे, मुख्याधिकारी पंकज सोनोने, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, गटविकास अधिकारी खेडकर आदी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी  सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण हेच आपले प्रमुख कर्तव्य आहे. कोणतीही तक्रार प्रलंबित ठेवली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने व उत्तरदायित्वाने काम करावे.


दर बुधवारी रिसोड व मालेगाव तहसील येथे तक्रार निवारण दिन: 

दर बुधवारी रिसोड व मालेगाव तहसील येथे तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होत असून, नागरिकांमध्ये शासनाबद्दल विश्वास निर्माण होणार आहे. दर बुधवारी तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन नियमितपणे घेण्यात येणार असून, शासकीय सेवा अधिक गतिमान व पारदर्शक होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

0 Response to "नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस रिसोड व मालेगाव येथे 'तक्रार निवारण दिन संपन्न' "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article