सौ अर्चना कदम समाजसेविका कारंजा राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानित !
साप्ताहिक सागर आदित्य/
सौ अर्चना कदम समाजसेविका कारंजा राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानित !
कारंजा [लाड ] : वाशिम जिल्ह्याच्या नेफडो जिल्हाध्यक्षा, पतंजली योग शिक्षिका तथा समाजसेविका - सौ अर्चना कदम यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचा राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्कार देण्यात आला . नुकताच,अंकुशराव लांडगे सभागृह पुणे येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन भारत विकास संस्थे चा स्नेहसम्मेलन 2022 कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी सिनेअभिनेते मा जयराज नायर यांच्या हस्ते सौ अर्चना कदम यांना निसर्ग मित्र पुरस्कार 2022 देण्यात आला . कार्यक्रमाला संस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी हजर होते. सौ अर्चनाताई यांनी,संस्थेअंतर्गत वृक्ष लागवड व संवर्धन करणे ,गरजू लोकांना कपडे वाटप, covid-19 मध्ये अन्नधान्य वाटप आवश्यक सामुग्री वाटप केले. पतंजली अंतर्गत दोन महिने कोरोना पेशंट साठी विनामूल्य ऑनलाइन योगा घेतला. त्याबद्दल, यापूर्वी सुद्धा त्यांना मागील वर्षी त्यांना भारतभूषण पुरस्कार 2021 व नारी रत्न पुरस्कार अर्चना कदम यांना मिळाले होते . महाराष्ट्र शासनाचा, निसर्गमित्र पुरस्कार 2021 , नाआदित्यजी ठाकरे यांचे हस्ते मिळाला, शांतिदूत रक्षक पुरस्कार 2021, आय पी जी डॉ विठ्ठल रावजी जाधव पुणे यांनी दिला होता . चालू वर्षाचा राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे तथा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
0 Response to "सौ अर्चना कदम समाजसेविका कारंजा राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानित !"
Post a Comment