
शासनानी मौजे कोयाळी ( बु ) रिठद येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी - गोपाल भिसडे
साप्ताहिक सागर आदित्य
शासनानी मौजे कोयाळी ( बु ) रिठद येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी - गोपाल भिसडे
रिसोड तालुक्यातील मौजे
कोयाळी( बु )रिठद गावातील एकमेव संपूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे,याच विहिरीच्या आजूबाजूला नाले असून संपूर्ण नदी नाल्यातील खराब, बोगस, निकृष्ट दर्जाचे नाल्याचे पाणी या विहीरीमध्ये येते,संपूर्ण गाव हे या पाण्याला त्रस्त आहेत, घरोघरी पेशंट दिसेल दूषित पाण्यामुळे अनेकांची आरोग्य धोक्यात आलेली उदाहरने दिसत आहेत, लोकांची गळे, तापीची साथ व इतरत्र आजाराचे प्रमाण गावामध्ये मोठया संख्येने वाढले असून , ही पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणून घेऊन आमची प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी चांगल पाणी गाववासियांना प्यायला मिळेल जेणेकरून लोकांची आरोग्य धोक्यात येणार नाही, तरी शासनाने लक्ष घालून हा पाण्यांचा प्रश्न मिटवावा, चांगल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी ही विनंती संपूर्ण ग्रामवासियांकडून गोपाल भिसडे यांनी केली आहे,,
0 Response to "शासनानी मौजे कोयाळी ( बु ) रिठद येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी - गोपाल भिसडे"
Post a Comment