
सोयापेंड आणि तुर आयात शेतकऱ्यांच्या मुळावर
साप्ताहिक सागर आदित्य/
सोयापेंड आणि तुर आयात शेतकऱ्यांच्या मुळावर
केंद्र सरकारने पोल्ट्री उद्योगचा वाचार करून पाच लाख मेट्रिक टन सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतला. सोयाबीन बाजारावर त्याचे अनिष्ट परिणाम दिसायला लागले. विदर्भातील सर्वच बाजारपेठेत सोयाबीनचे दर क्विंटल मागे हजार रूपयाने तुटले. साडेसात हजार रू क्विंटलला आसलेले दर सोयापेंड आयातीच्या निर्णयाने एक हजार रूपयाने तुटले. तुटलेल्या दराचा खाद्य तेलावर कोणताही परिणाम झालेला नाही. खाद्य तेल आजही एकसे पासष्ट ते एकसे सत्तर रूपये किलोनेच विकले जात आहे . त्यामुळे एकीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थिक फटका बसत आसतांना दुसरीकडे सर्व सामान्य माणसाला मात्र कुठलाही दिलासा त्यातुन मिळतांना दिसत नसल्याची प्रतीक्रीया भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली . उन्हाळी सोयाबीन उत्पादक शेतकरी, सोयाबिनचा स्टाॅक करून ठेवणारे व्यापारी, खाद्य तेल ग्राहक या सर्व घटकांना अर्थिक भुर्दंड देवुन शासनाने केवळ पोल्ट्री उद्योगाचा विचार करून घेतलेला हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
सोयापेंड च्या आधी केंद्र सरकारने तुर आयातीसाठी भारतीय बाजारपेठ खुली करून टाकली. त्यामुळे तुर उत्पादकांनाही अर्थिक फटका बसत आहे. या दोन्ही निर्णयातुन सरकारने तेल उत्पादक आणि दाळ उत्पादक असणार्या विदर्भातील कोरडवाहु शेतकऱ्यांना वेठीस थरले आहे. दर आठ तासाला विदर्भात एक कोरडवाहु शेतकरी अत्महत्या करत असतांना आसे चुकीचे निर्णय घेणे हे अविचारी पणाचे ठरत आहे. मोठ- मोठया योजनां आणि पायाभूत सुविधांचा विचार करत असतांना विदर्भातील गरीब व कोरडवाहु शेतकऱ्यांचाही विचार केंद्र सरकारने करावा अशी प्रतीक्रीया भूमिपुत्र कडुन देण्यात आली आहे .
0 Response to "सोयापेंड आणि तुर आयात शेतकऱ्यांच्या मुळावर "
Post a Comment