गरजू, गरीब, विधवा, अपंग, मागासवर्गीयांवर ग्राम पंचायतचा अपात्र ठरवून त्यांच्यावर अन्याय
साप्ताहिक सागर आदित्य/
गरजू, गरीब, विधवा, अपंग, मागासवर्गीयांवर
ग्राम पंचायतचा अपात्र ठरवून त्यांच्यावर अन्याय
सर्वांपेक्षा पक्के घरे असणार्यांना पात्र ठरवून गरजू लोकांवर अन्याय करुन इतरांना संगणमत करुन लाभ पोहचविण्यात आला. काही लोकांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये काही जणांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे. तसेच त्यामध्ये काही जण असे आहेत की ज्यांची लग्ना सुध्दा झालेली नाहीत. त्यांना घरकूलाच्या पात्र लाभार्थ्यांमध्ये निवड करण्यात आलेली आहे. पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आलेली त्रिसदस्यीय समितीमधील कर्मचार्यांनी संगनमत करुन निवेदन करण्यापेक्षा सुस्थितीत तथा पक्के घर असणार्यांना पात्र ठरवून त्यांना लाभ पोहचवून निवेदनकर्त्यांवर अन्याय केलेला आहे. तरी निवेदनकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर निता डिगांबर जाधव, गंगुबाई जनार्धन लहाने, लताबाई माधवराव जाधव, अनिल शंकर कांबळे, विजय संतोष जाधव, रतन नाथा, संदीप विश्वनाथ, दिपक रामरास जाधव, खंडू दगडू उगले, पांडूरूंग भगवान , गणेेश व जाधव व बहुसंख्य गावकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Response to "गरजू, गरीब, विधवा, अपंग, मागासवर्गीयांवर ग्राम पंचायतचा अपात्र ठरवून त्यांच्यावर अन्याय"
Post a Comment