
दशलक्षम तप समाप्ती निमित्त शोभायात्रा उत्साहात दिगंबर जैन समाजात श्रावका द्वारे दशलक्ष्ण पर्व एक पवित्र पर्व, उत्सव म्हणून
साप्ताहिक सागर आदित्य
दशलक्षम तप समाप्ती निमित्त शोभायात्रा उत्साहात दिगंबर जैन समाजात श्रावका द्वारे दशलक्ष्ण पर्व एक पवित्र पर्व, उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. हा पर्व दहा दिवस साजरा करण्यात येतो. या पर्वाचा मुख्य उद्देश भगवान महावीर स्वामी च्या मूळ सिद्धांत अहिंसा परमो धर्म, जिओ और जीने दो या मार्गावर चालत मोक्षप्राप्तीच्या मार्ग प्राप्त करणे. संपूर्ण विश्वासाठी हा एक उत्तम आणि उत्कृष्ट पर्व आहे .कारण यामध्ये आत्म्याची उपासना करण्यात येते. संपूर्ण जैन समाजासाठी हा महा कुंभ पर्व आहे. पापाची पुंजी नष्ट करण्यासाठी या परवाची आराधना करण्यात येते. दशलक्षण पर्व या दिवसात उत्तम क्षमा, मार्दव,आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग ,अकिंचन आणि उत्तम ब्रह्मचर्य याचे पालन केल्या जाते .अशीच कठीण आराधना, तप करीत वाशिम येथील खंडेलवाल दिगंबर जैन समाजातील संजोग छाबडा यांनी षोडश कारण व्रत करून 32 दिवस उपवास केले .या दिवसात त्यांनी फक्त एक वेळ पाणी ग्रहण ग्रहण केले .तसेच मनीष काला यांनी सुद्धा अशीच कठीण आराधना करीत 16 उपवास केले सौ सारिका छाबडा, समय छाबडा ,कलश छाबडा ,पराग जैन, सो प्रीती अचल बज तसेच चिन्मय गोधा या सगळ्यांनी दहा दिवस उपवास केले .यांच्या या कठोर तपस्येनंतर समाजातर्फे त्यांचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .मिरवणुकीत रथ गाडी ,बँड पथक ,भगवंतांच्या जयजयकाराने त्यांचे अभिनंदन स्वागत करण्यात आले .मिरवणूक पाटणी चौकातून ,जैन मंदिराजवळून जैन भवन अकोला नाका येथे समापन करण्यात आले .महाप्रसादाने मिरवणुकीचे समापन करण्यात आले.
0 Response to "दशलक्षम तप समाप्ती निमित्त शोभायात्रा उत्साहात दिगंबर जैन समाजात श्रावका द्वारे दशलक्ष्ण पर्व एक पवित्र पर्व, उत्सव म्हणून "
Post a Comment